महाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

पावसामुळे आतापर्यंत पाच जणांनी गमावले स्वतःचे प्राण.

शुक्रवारी मध्यरात्री बरसलेल्या पावसाने शनिवारपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असताना, त्यात रविवारी (ता.२४) आणखी एका मृताची भर पडली. कृष्णकुमार लेखराम बरखंडी (वय २१, रा. राणीडोंगरी, जमबाडा, बुदरूक, बैतुल, मध्यप्रदेश) यांचा धंतोली परिसरात असलेल्या गणेशसागर रेस्टॉरेट येथे भरलेले पाणी इलेक्ट्रिक पंपाने काढत असताना, विजेच्या धक्का लागल्याने मृत्यू झाला.

मध्यरात्री नागपूर शहरासह जिल्ह्यात तुफान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. धंतोली परिसरात असलेल्या गणेश सागर रेस्टॉरेन्टमध्येही पावसाचे पाणी शिरले. ते काढण्यासाठी नोकराने इलेक्ट्रिक पंप लावला. मात्र, त्याला विजेचा धक्का लागला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी समीर ताज मोहम्मद अंसारी (वय ३५, रा. वांजरा ले-आउट) याने दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!