दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

२३ सप्टेंबर दिन विशेष

आज दि. २३ सप्टेंबर २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३३, चंदवारो, पोठ्ठपाद मासो, सोमवार, भाद्रपद माहे.

२३ सप्टेंबर १९१७ – रोजी “संकल्प दिवस.” या दिवशी माननीय विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांची, सामान्य जन्नांची परिस्थिती बदलण्याचा संकल्प केला. इंग्लंडहून परत आल्यावर डॉ. आंबेडकर वडोदरा येथे पोहोचले आणि तेथे पारसी गेस्ट हाऊसमध्ये राहिले व तेथे त्यांचा अपमान झाला तसेच त्यांचे सामान बाहेर फेकण्यात आले. त्याचं क्षणी त्यांनी वडोदराहून मुंबईला परत जाण्याचा संकल्प केला, परंतु दुर्दैवाने त्यांची गाडी सुमारे पाच तास उशिराने सुटणार होती. त्यामुळे त्यांना सयाजीबागमध्ये आपला वेळ घालवावा लागला, ज्याला आज संकल्प भूमी म्हणून ओळखल्या जाते. येथेच त्यांनी देशात अस्पृश्य (वंचित पीडित) व सामान्य जनांशी वागण्याचे प्रकार बदलण्याचा संकल्प केला.

२३ सप्टेंबर १९३१ – रोजी मुखेड सत्याग्रह मराठा विरुद्ध महार यांच्यात चकमक झाली.

२३ सप्टेंबर १९३२ – रोजी गोगटे पंथाच्या पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी गुप्त सभा घेऊन माननीय विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खूण करण्याचा कट रचला.

२३ सप्टेंबर १९३२ – रोजी माननीय विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व प्रांतातील विधिमंडळात १९७ जागा मागितल्या. तसेच प्राथमिक निवडणुकीची पद्धत दहा वर्षांनी रद्द करावी, परंतु पंधरा वर्षांनी राखीव जातीच्या पद्धतीविषयी अस्पृश्यांचे सार्वमत घ्यावे असा आग्रह धरला.

२३ सप्टेंबर १९४४ – रोजी पेरियार रामस्वामी नायकर आणि माननीय विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली.

२३ सप्टेंबर १९४४ – रोजी मद्रास (चेन्नई) येथे शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला माननीय विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.

२३ सप्टेंबर १९४४ – रोजी मद्रास (चेन्नई) रेल्वे अस्पृश्य वर्गीय कामगारांतर्फे मजूर मंत्री माननीय विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्यात आले.

२३ सप्टेंबर १९५६ – रोजी माननीय विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपण विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरला सकाळी बौद्ध धंम्म स्विकारणार असल्याचे प्रसामाध्यमांतून जाहीर केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!