७२ तासानंतर साताऱ्या मध्ये इंटरनेट सेवा सुरु.

बुधवारी रात्री १२ पासून इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.पोलीस प्रशासन आणि सायबर सेलची समाज मध्यमावर करडी नजर राहणार आहे.
सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा ७२ तासांनी प्रशासनाकडून पूर्ववत करण्यात आली आहे.मात्र जमाव बंदी आदेश अद्याप हटवण्यात आलेला नाही.पुसेसावळी येथे झालेल्या दंगली नंतर नव्याने तणाव निर्माण होवू नयेत यासाठी प्रशासनाकडून मागील तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद होती.सलग तीन दिवस इंटरनेट सेवा बंद राहिल्याने व्यापार उद्योग आणि बँकिंग व्यवहार ठप्प राहिले होते.नेट बंद राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना आले यश आले.
बुधवारी रात्री १२ पासून इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.पोलीस प्रशासन आणि सायबर सेलची समाज मध्यमावर करडी नजर राहणार आहे.अफवा पसरवल्यास होणार आता तुरुंगवास होणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अफवा पसरून जिल्ह्यातील शांतता बिघडू नये आणि वातावरण गढूळ होऊ नये या हेतूने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामान्य जनता यांचे हाल झालेेले पाहायला मिळाले.अखेर आज इंटरनेट सेवा सुरू झाल्याने सातारकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.इंटरनेटमुळे व्यवहार पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत