महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

शोषित – पिडीतांचा मरणांतिक संघर्ष

हंसराज कांबळे
8626021520
नागपूर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती – प्रतीक्रांती त्यांच्या लिखित पुस्तकात ब्राह्मण धर्म आणी बौद्ध धर्म ह्यातील जातीयवाद किती फोफावला होता आणी आताही तो छूप्या अजेंडाने चालूच असून त्यांची खेळी आपल्याला लक्षात येणारच नाही. तसा हा नागपूर दीक्षाभूमीच्या संदर्भातील पवित्रा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धर्मशास्त्रवेत्ता होतेच तसेच ते राजकारणीपटू , बहुआयामी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. म्हणून ते म्हणतात –

कारण जो कोणी भारताचा इतिहास जाणू इच्छितो , त्याला भारताचा इतिहास हा ” ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म ” यांच्या प्रभुत्वासाठी झालेल्या संघर्षाखेरीज इतर काही नाही हे समजणे आवश्यक आहे. तसेच – भारताच्या इतिहासा इतका धर्माचा प्रभाव इतर कोणत्या देशातील इतिहासावर दिसून येत नाही. भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यामधील मरणांतिक संघर्षाचा इतिहास आहे.
संदर्भ – क्रांती – प्रतिक्रांती. पृष्ठ. क्रं. 39 पैरा – पहिला.

ब्राम्हणी संघाला राजसत्तेत येण्यासाठी जवळपास 100 वर्ष वाट पाहावी लागली. तेव्हा कुठे त्यांनी 2014 ते 2024 ह्या काळात लगातार भारतात राजयोग मनमानी प्रमाणे भोगीत आहेत. त्यांनी हिंदू धर्माच्या नावाखाली त्या लोकांना देऊळे , मंदिर बांधून त्यांनी देव – धर्माच्या नावाखाली बंदिस्त केले आहे. ब्राह्मणांनी मिळवलेली सत्ता ते कसे टिकवून धरू शकतात याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत जाणून घेऊ या ते म्हणतात –

ब्राह्मणांनी मिळवली सत्ता ते कायम टिकवून धरू शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा धोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहणारे ध्येयवादी कार्यकर्ते त्यांच्यात निपजतात

संदर्भ – खंड. 18 भाग – 2. पृष्ठ. क्रं. 342.पैरा – पहिला. शेवटची ओळ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी उपरोक्त पणे केलेले भाष्य आजही तंतोतंत खरे ठरत आहे. आणी सन 2014,- 2024 हा कालवधी तोच साक्ष देत असून आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहो. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी पूर्वीच्या इतिहासाची साक्ष पटवून देताना भारतातल्या मुस्लिमांनी ब्राह्मणांना कसा राजाश्रय दिला हयाची काही उदाहरणे दिली आहेत. म्हणून ब्राम्हण हे मुस्लिम , शीख ह्यांच्या विरोधात कधीही चेतावणीखोर भाष्य करताना दिसत नाही. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी इसवी सन 712  , 880 ते 1021 ह्या कालावधीच्या दरम्यान  शूद्र राजा ह्याने राजाचे शासन कसे केले आणी ब्राम्हणानी कूटनीती करून त्यांना कसे देशोधडीस लावून राजाश्रय भोगला ती काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.पहा ते काय म्हणतात - 

पहिली गोष्ट –

मुस्लिम आक्रमणाच्या वेळी ब्राह्मणवादाला राजाश्रय प्राप्त होता. बौद्ध धर्माला मात्र राजाश्रय प्राप्त नव्हता. परंतु सर्वाधिक महत्त्वपूर्ण गोष्ट ही की , बौद्ध धर्म पूर्णपणे नष्ट होईपर्यंत ब्राह्मणवादाला भारतात राजाश्रय प्राप्त होतात

दुसरी गोष्ट –

 इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्षूचे पूर्णपणे शिरकाण केले व बौद्ध भिक्षू परंपरेला दुसऱ्यांदा पुनर्जीवित करता आले नाही. यावरून ब्राह्मणवादी पौरोहित्याला कायमचे नष्ट करणे मुस्लिमांना शक्य झाले नाही 

तिसरी गोष्ट –

भारतातील ब्राह्मणवादी शासकांनी बौद्ध बहुसंख्य  जनतेवर अत्याचार केले. त्यांच्या या अत्याचार व छळापासून बचाव करण्याकरिता भारतातील बहुसंख्यांक बौद्ध जनतेने मोठ्या संख्येने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी बौद्ध धर्माला कायमचे सोडून दिले 

संदर्भ – क्रांती – प्रतीक्रांती. पृष्ठ. क्रं. 31 पैरा – मधला. वाचा.

उपरोक्त संदर्भावरून येणेप्रकारे बौद्ध धर्माला नष्ट करण्याचे कटकारस्थान ब्राह्मणानी केलेले आहेच.इसवी सन 712 चा भारताचा शूद्र राजा सिंध प्रांतचा होता त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत जाणून घेऊ या ते म्हणतात - 

मुस्लिम प्रभावाखाली येणारा भारतातील सर्वात प्रथम प्रांत सिंध होता. पूर्वी या प्रांतावर शूद्र राजा राज्य करीत होता. परंतु एका ब्राह्मणांनी हे राज्य बळकावले. या वंशाचे शासन सिंधीवर 712 पर्यंत चालले. इसवी सन 712 मध्ये इब्न कासिम द्वारा सिंधवर आक्रमण झाले. तेव्हा एका ब्राह्मण शासकाद्वारे ब्राह्मण धर्माला वाचविणे स्वाभाविक होते. सिंधचा शासक दाहीर होता. दाहीर हा ब्राह्मण वंशाचा होता  

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 31 पैरा – शेवटचा.

तसेच पंजाब मधील बौद्ध राजा ह्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारवंत लेखक - हूएनत्संगचा ह्यांचा संदर्भ देऊन ते म्हणतात  - 

त्यांच्या वेळी पंजाब मध्ये बौद्ध वंशाच्या राजाचे शासन होते. या वंशाने पंजाब वर 880 पर्यंत शासन केले. नंतर हे राज्य " लल्लिय " नावाच्या ब्राह्मणाने बळकावले व त्याने ब्राह्मणवादी धर्माला राजाश्रय दिला. या वंशाने पंजाब वर 880 ते 1021 पर्यंत शासन गेले. यावरून हे दिसून येते की  , ज्यावेळी सुबुक्तगीन आणि मोहम्मद कासिमने पंजाबवर आक्रमण केले. त्यावेळी भारतातील बहुतेक शासक ब्राह्मण धर्मावलंबी होते. " जयपाळ ( 960 - 980 ) , आनंदपाल  ( 980 - 1000 ) व त्रीलोचनपाल  ( 1000 - 21 ) हे सर्व ब्राह्मण धर्मावलंबी होते 

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 31 – 32.पैरा – शेवटचा. पहिला.

तसेच पूर्वीच्या काळातील पाल वंश आणी सेन वंशा बद्दल शासक राज्य कसे होते ते पहा  - 

पश्चिम बंगालवर पाल वंशाच्या शासकाचे राज्य होते तर पूर्व बंगालवर सेन वंशाचे राज्य होते. पाल हे क्षत्रिय होते व ते बौद्ध धर्मावलंबी होते. सेन वंशाबद्दल मात्र मतभेद आहेत. अधिकांश विचारांच्या मते , सेन हे प्रारंभी बौद्ध होते व नंतर ते ब्राह्मणी धर्माचे कट्टर समर्थक बनले

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 32.पैरा – मधला.

  त्यावेळेच्या भारतातल्या इतिहासानुसार अल्लाउद्दीन खिलजीने केलेली स्वारी ह्यात काही बौद्ध भिक्खु मारलेत आणी काही भिक्खु सापडेल त्या मार्गाने बाहेर देशात पळून गेलेत तसेच मुस्लिमांच्या आक्रमणामुळे आणी ब्राम्हणांनी शूद्र राजाचे कपटवृतीने बळकावलेले राज्य हिरावून घेतले हे आपण उपरोक्त संदर्भानुसार पाहिलेले आहे. त्यावेळेसच्या पतनाच्या अवस्थेकडे झुकलेल्या बौद्ध धर्माच्या वाढीची अपेक्षा मुळीच उर्वरित राहिलेल्या लोकांकडून नव्हती आणी बौद्ध धर्मात काही सुधार करून त्याला श्रेष्ठ स्थान प्राप्त करून देण्याचे समर्थ पूर्वी या लोकात नव्हते याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण हा त्यावेळेस किती चतुर ,  हुशार धूर्त होता याविषयी ते म्हणतात -  

नवीन धर्माचरणी लोक , मूळ भिक्षुंच्या तुलनेत फारच हलक्या दर्जाचे असून ज्ञानवान तर मुळीच नव्हतेच. बौद्ध धर्माचे कट्टर विरोधक ब्राह्मण पुरोहिताच्या तुलनेत हे नवीन लोक कमजोर होते. कारण की ब्राह्मणांचा वर्ग हा चतुर आणि धूर्त होता

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 36.पैरा – पहिला.

सारांश रुपाने त्यावेळेस ब्राह्मण लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी देशाचे हितकर्ते न समजता धर्माचे विध्वंसक असेच संबोधले आहे म्हणून ते पूर्वीच्या इतिहासाचा पुरावा देऊन ब्राह्मणवाद कसा आहे ते म्हणतात - 

त्यावेळेला जर कोणते संकट असेल तर ते म्हणजे ब्राह्मणवाद हेच होय 

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 38.पैरा – शेवटचा.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा जन्म आपल्या भारत देशात झाला. त्यांच्या बालपणापासून ते शेवटच्या घटके पर्यत त्यांनी सोसलेले कष्टमय जीवन  , यातना भोगून आपल्या ज्ञानसंपदाच्या बुद्धी चातुर्याच्या  भरोशावर आपणा सर्वाना गुलामगिरीच्या जखड्यातून मुक्त केले. पूर्वीच्या शूद्र राज्याचे राज्य ब्राम्हणांनी कपटवृतीने बळकावून घेतले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी मात्र त्यांच्याच स्वतःच्या मरणप्राय यातना भोगून त्यांनी त्यांच्या अनुभवातून शब्दात व्यक्त केलेले माझ्या जागी दुसरा असता तर त्याचा समूळ नाश झाला असता हे त्यांचे वाक्य सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. 

  ब्राह्मणांचा ब्राह्मणी कावा हा धूर्तपणाचा असतोच फक्त त्यावर आपला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाळत ठेवणे गरजेचे आहे. भगवान बुद्धाच्या संघात ब्राम्हणांनी शिरकाव करून मूळ शिकवणुकीत भेसळ करून ठेवली. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी महायान आणी हीनयान पंथापासून माझ्या समाजाला अलिप्त ठेवीन असा संदेश दिला तेच चिवरधारी भन्ते जे तथागत बुद्धांनी सांगितले नाही तिच शिकवण बौद्ध उपासकांना धम्मदेशना द्वारे पठण करीत असतात. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ समजून घेण्यापूर्वी  , समजण्यासाठी क्रांती - प्रतीक्रांती , बुद्ध आणि कार्ल मार्क्स ही माझी लिखित पुस्तके वाचायला हवीत. त्याबद्दल ते म्हणतात  - 

 नमूद करू इच्छितो की , बुद्ध धम्माचे योग्यरित्या आकलन होणाऱ्या तीन ग्रंथांच्या संचातील प्रस्तुतचा एक भाग आहे. ( बुद्ध आणि त्यांचा धम्म ) अन्य दोन आहेत. 1) बुद्ध आणि कार्ल मार्क्स  2) प्राचीन भारतातील क्रांती - प्रतिक्रांती. ते विभागश: लिहिलेले आहे ते लवकरच प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे

संदर्भ – खंड. 20.पृष्ठ. क्रं. 461 , 15 मार्च 1956.
तसेच भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या तीन वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे असे म्हणतात.
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं 176 ते पृष्ठ. क्रं 238. एकाग्रतेने वाचन करावे त्यात प्रकरण 8 मध्ये ” धर्म पुस्तके प्रमादाकीत आहेत असे म्हणणे म्हणजे अधर्म आहे.

त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 15 मार्च 1956 रोजी बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाकरता प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेप्रमाणे बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ 1) बुद्ध अँड कार्ल मार्क्स 2) रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शट इंडिया या ग्रंथाशिवाय परिपूर्ण होत नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे.

संदर्भ – खंड. 20.पृष्ठ क्रं. 460.

 शेवटी असेच म्हणावे लागेल की , ब्राह्मणवर्ग हा राजकारण असो की समाजकारण असो प्रत्येक क्षेत्रात कावेबाजी करण्यात पारंगत आहे. पूर्वीचे आणी आताचे ब्राह्मण ह्यांची पिलावळ सुद्धा त्याच धर्तीवर सुरुंग लावून कटकारस्थान करण्यात माहीर आहेत. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मणांना चतुर व धूर्त अशी उपाधी लावून संबोधले आहे.

दि. 30 जून 24.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!