निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

निवडून आल्यावर टक्केवारी घेणार नाही..! महादेव जाणकारांनी आईची शपथ घेत दिले आश्वासन

परभणी : आपण निवडून दिलेले नेते झटपट श्रीमंत कसे होतात या सर्वसामान्य मतदाराच्या प्रश्नाचे उत्तर महादेव जाणकर यांनी अप्रत्यक्ष पणे दिले आहे. टक्केवारी घेणे, जमिनी बळकावणे अशी कामे राजकारणी लोक करत असतात पण आपण करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व जाती-पातीच्या, धर्माच्या नागरिकांनी मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे. मी या संधीचे निश्‍चितपणे सोने करेन. कधीही मतदारांची, मतदारसंघाची प्रतारणा करणार नाही, आई शप्पथ कधीही टक्केवारी खाणार नाही, की जमिनी हडपणार नाही, अशी प्रतिज्ञाच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी घेतली आहे.

आपणास घरदार नाही, आपण टक्केवारी खाणार्‍यांपैकी नाही किंवा जमिनी हडपणारेही नाही. आपण पूर्णतः परभणीकर होवू अन् या जिल्ह्यासाठी सर्वार्थाने स्वतःला वाहून घेऊ. काळ्या कसदार मातीला हिरवा शालू नेसवू, असेही ते म्हणाले. या मतदारसंघातून रोजगारानिमित्त मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ परप्रांतात स्थलांतरीत होत आहेत. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती केल्याशिवाय जिल्ह्यातून होणारे हे स्थलांतर थांबणार नाही, असेही स्पष्ट करीत जानकर यांनी आपण या जिल्ह्यात खेड्यापाड्यापर्यंत, वाडी-तांड्यापर्यंत पोहोचत आहोत, सकाळी पाच वाजेपासून रात्री उशीरापर्यंत दौरे करीत आहोत, मतदारांच्या गाठीभेटी घेवून हितगुज करीत आहोत, आपणास निश्‍चितच यश मिळेल परंतु ते सर्वांच्या भक्कम सहकार्याने व आशिर्वादामुळेच असेल, असेही ते म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!