पप्पू ते जन नायक ,,,


राहुल गांधी,,,,,!
अचंबित करणारा राजकीय प्रवास .
ऍड अविनाश टी काले , अकलूज
डॉ आंबेडकर चौक , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो नं :- 9960178213
भारतीय राजकारणाचे निरीक्षण करत करत माझे ही 40ते 45 वर्ष सरली आहेत , आज मी वयाची 60वर्ष गाठली आहेत.
अगदी न कळत्या वयात आंबेडकरी चळवळीचा वारसा असलेल्या घरात जन्म , आणि शालेय जीवनात इयत्ता 8वित आजोळी संघ शाखा ते ज्युनियर कॉलेज जीवनात, समाज वादी ,(छात्र युवा संघर्ष वाहिनी) दलीत पँथर आणि लॉ कॉलेज मध्ये अगदी जहाल अश्या मार्क्स वादी चळवळी कडे आकृष्ट होणे , तिथून संसदीय राजकारणात पवार साहेबांच्या “Total love and affection” पडणे हे सर्व घडून गेले .
याच कॉलेज जीवनात सामाजिक समरसता मंच ही जवळून पाहिला ,
कदाचित माझा समाज (नवबौध्द) हा सामाजिक राजकीय दृष्ट्या मुख्य समाज धारे पासून अलग पडलेला आहे याची तीव्र जाणीव होत गेली आणि यातून किमान आपला समाज या बहुसंख्यांक समाजा पासून अलग राहू नये म्हणून त्यांच्यात ही मिसळत गेलो ,
अगदी गझल सम्राट स्मृतिषेश सुरेश भट यांच्या भाषेत
” पंगती साठी न त्यांच्या मी तिथे गेलो, “
शोधली मी चोरलेली ताटली माझी”
आमचं जीवन , आणि जीवनाची वाट शोधत कतूहल म्हणून मी त्या घराच्या प्रत्येक खिडकीत डोकावल .
मी कुणाला कळलोच नाही,,, अशी माझी अवस्था ,,,
पण मी पाहत राहिलो , जेंव्हा आणीबाणी आली तेंव्हा मला फारसे कळत नव्हते . पण आणीबाणी ने लोकांच्या अधिकाराचा संकोच केला अस वाचण्यात आल .
पण आत्ता जाणवत ते हेच की , जे अनेक वर्ष साध्य करता आले नव्हते ते आणीबाणी चे कालखंडात स्व इंदिराजी गांधी यांनी घडवून आणले होते .
देश सावकार मुक्त केला होता , अनेक गरिबांच्या घरची तांब्या पितळे ची भांडी ही सावकारांच्या घरी गहाण पडलेली होती ती माघारी आली ,
जमीनदारी वर मोठा आघात करत सीलिंग कायदा आला , आणि कमाल जमीन धारणा कायद्याने अतिरिक्त ठरलेल्या जमिनीचे वाटप भूमिहीन दलीत , आदिवासी , माजी सैनिक यांच्यात करण्यात आले .
खाजगी बँकाचे राष्ट्रीयकृत बँकेत रूपांतर करण्यात आले ,
अश्या अनेक चांगल्या बाबी घडून आल्या , इतकेच नाही तर संस्थानिकांचे पेन्शन ही बंद करण्यात आले ,
समग्र देश आर्थिक विषमता संपवण्याच्या कार्यासाठी सज्ज झाला .
पण आपल्या कडील मानसिकता हीच असते की , जे उच्च सत्ताधारी वर्ग ठरवतात तीच दिशा सामान्य लोक ही स्वीकारतात ,, यातून सत्तांतर झाले आणि याच सत्तातरांच्या मंथनातून जनसंघ ही सत्तेत आला , आणि पुढे दुहेरी निष्ठा चे मुद्द्या आधारे भारतीय जनता पार्टी म्हणून अधिकृत नोंदणीकृत पक्ष म्हणून देशात अवतीर्ण झाला ,
देश भरा तील लाखो संघ स्वयंसेवक हे त्याचा आधार बनले आणि या पक्षासाठी ते कार्यरत राहिले .
संघीय माणसांचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य कोणते असेल तर ते काँग्रेस द्वेष हेच राहिले ,
महात्मा गांधी जी यांचा सर्वाधिक तिरस्कार कोणी केला असेल तर तो फक्त संघाच्या स्वंयसेवकानी च केला .
देशाच्या फाळणीला गांधी च जबाबदार होते हे त्यांनी जन माणसात पेरले पण द्वि राष्ट्र वादाचा सिद्धांत कोणी आणला ? हे ते सांगत नाहीत , आणि मुस्लिम लीग शी समझोता करून जनसंघाने काँग्रेस चे विरोधात निवडणुका लढवल्या हे ही सांगत नाहीत .
भारत हे हिंदू राष्ट्र बनावे हाच त्यांचा मुख्य अजेंडा , आणि या राष्ट्रवादा चे पासून अलग आहेत ते या देशातील अल्पसंख्यांक ,, विशेषतः मुस्लिम व ख्रिश्चन ,,
इतर अल्पसंख्याक जसे की जैन , बौद्ध , शीख , लिंगायत हे एकतर पंथ आहेत , आणि यांची सांस्कृतिक नाळ ही इथल्या संस्कृतीशी आहे असा त्यांचा युक्तिवाद .
दुसऱ्या बाजूने हिंदू मधील शूद्र ,(ओबीसी ) एस सी , एस टी (वर्ण बाह्य) हे आरक्षणाचे लाभार्थी , म्हणून गुणवत्ता विहीन आणि गुणवत्ता राखण्यासाठी आरक्षण असण्याला यांचा विरोध .
या बहुसंख्य वर्गातील समूहाने प्रशासनात , शासन व्यवस्थेत आपली भागीदारी ही शोधू नये आणि त्या प्रति आग्रही ही राहू नये अशी धारणा असल्याने “आरक्षण हे आर्थिक आधारे असावे अशी मागणी करत राहणे हा यांचा स्वभाव ,,
भारतीय समाजात निर्माण झालेले गरीब श्रीमंत वर्ग ही जाती रचनेची देणं आहे हे नाकारून फक्त आर्थिक आधारे भागीदारी देण्या इतकी निष्पक्षता यांच्या अंतर्मनात आहे का हा संशोधनाचा भाग .
पण दुर्दैवाने काँग्रेस चां कब्जा ही अश्याच उच्च वर्णीय प्रस्थापित यांच्या कडे राहिला , आणि यातून
काँग्रेस मध्ये ही राज्य निहाय प्रस्थापित घराणी निर्माण झाली ज्यांच्या हातात समग्र आर्थिक , सामाजिक , राजकीय , शैक्षणिक व्यवस्था एकवटली ,
मतदार हा निवडणूक कालखंडा पुरता राजा राहिला , आणि प्रत्यक्षात मात्र तेच राजे बनले जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले .
गांधी , नेहरू , यांची परंपरा घेऊन इंदिरा जी गांधी आल्या , त्यांनी पाकिस्तान ची फाळणी घडवून बांगला देश बनवला ,
“आयर्न लेडी” म्हणून इतिहासात त्यांची ओळख निर्माण झाली .
खलिस्तान चळवळीचा उदय आणि सुवर्ण मंदिरातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार ” याने भिंद्रनवाले संपले , पण 1984साली त्यांच्याच अंगरक्षकानी त्यांचे वर गोळीबार केला .
गुप्तचर यंत्रणांनी इशारा देऊन ही शीख समाजावर विश्वास ठेऊन त्यांनी त्या अंग रक्षकांना दूर केले नाही , हा त्यांचा असलेला विश्वास होता .
याच दुःखाचे ओझे खांद्यावर असताना मूलतः पायलट असलेल्या स्व राजीव जी गांधी यांनी शासन व्यवस्थेचा भार आपल्या खांद्यावर घेतला , जनतेने ही या नेत्यावर अपार प्रेम केले .
श्री लंकेतील तामिळी इलम ची मुक्ती चळवळ , आणि राजीवजी यांनी पाठवलेले भारतीय शांती सैनिक याने अस्वस्थ होऊन
मानवी सुसाईड बॉम्ब ( फिदाईन) हमल्यात राजीव जी यांच्या देहाचे असंख्य तुकडे झाले गोळा करून ही देश न सोडता सोनियाजी देशातच राहिल्या ,
मनात इच्छा नसताना ही त्या काँग्रेस मध्ये सक्रिय झाल्या , आणि या सत्तेत येतील हे हेरून परदेशी मूळ चे मुद्दे राजकारणात आणले गेले .
ते कुणी आणले हे सर्व जण जाणतात , आणि यातूनच काँग्रेस ही दुंभगली आणि राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना ही 1999साली करण्यात आली ,
काँग्रेस चे पोटातून असंख्य प्रादेशिक पक्षांची निर्मिती होणे या मुळे काँग्रेस कमजोर सदरात गेली असे वाटत असतानाच काँग्रेस पुन्हा पुन्हा उसळी मारून गत वैभव प्राप्त करते हा भारतीय राजकारणाचा इतिहास झाला आहे .
सत्ता स्वतः कडे न घेता डॉ मनमोहन सिंग यांच्या सारख्या जागतिक दर्जाच्या अर्थ तज्ञाकडे पंतप्रधान पद काँग्रेस पक्षाने सोपवले ,
शक्य असून ही राहुल जी गांधी यांच्या कडे मंत्रिपद दिले गेले नाही .
वर पाहिलेली काँग्रेस ची प्रस्थापित घराण्यात एकवटलेली सत्ता , आणि त्या विरोधात सत्ता बाह्य असलेला बहुसंख्य ओबीसी ,एस सी, एस टी , यांना सोबत घेऊन भाजप ने हिंदुत्वाचे सुरू केलेले राजकारण हा पर्याय सत्ता बाह्य इतर सर्व जाती समूहांना वाटला ,
आणि भाजपा हा ही एक पक्षच आहे अशी धारणा बहुतेकांची झाली .
पण
भाजपा ही आर एस एस ची राजकीय विंग आहे , आणि त्यांच्या हिंदू राष्ट्र निर्मिती चे उद्दिष्ट पूर्ती साठी सत्ता हस्तगत करण्याचे ते एक माध्यम आहे इतकाच याचा अर्थ होता .
ही बाब सूर्य प्रकाशा इतकी स्पष्ट आहे की,
हिंदू राष्ट्र निर्मिती करायची असेल तर प्रचलित राज्य घटना , प्रचलित राज्य व्यवस्था याचे उच्चाटन त्यांना आज ना उद्या करावेच लागेल .
जी बाब आज कपोल कल्पित आहे , भयगंड निर्माण करणारी आहे अस त्यांचं कितीही म्हणणे असेल तरी ही त्यांना ते पूर्णतः नाकारता येणार नाही
फक्त त्या साठी ची अनुकूल परिस्थिती केंव्हा निर्माण होते याची ते वाट पाहत आहेत .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्प्रयासाने आपल्या बुध्दी चातुर्याने
दोन तृतीयांश बहुमताची अट आणि दोन तृतीयांश स्टेट यांची सहमती ची अट घातली नसती, तर ही घटना या लोकांनी कधीच डस्ट बिन मध्ये टाकली असती
भाजप चे आश्रयाला जाऊन ” भारतीय राज्य घटनेला हात लावणाऱ्या चे हात छाटून टाकू” अश्या गिधड धमक्यांना आणि तथा कथित वाघांना त्यांनी कधीच भीक घातली नसती .
भारतात बहुसंख्य हिंदू आहेत ,यातील बहुसंख्य वर्ग इतका अज्ञानी आहे की आपल्या हिताचे काय ? आणि आपले अहित कशात आहे हे न समजणारी जनता आहे
आणि या वर्गाचा बुध्दी भेद करण्या इतकी सोपी बाब जगाच्या पाठीवर दुसरी नाही , 5000वर्षा पासून ते हे करत आलेले आहेत .
अश्या झुंडी चां उदय झालेल्या अवस्थेत राहुल जी यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली ,
पप्पु म्हणून त्यांना हिनवण्यात आले ,
प्रसार माध्यमे , सोशल मीडिया यातून त्यांची टिंगल टवाळी करण्यात आली ,
सावरकर वाद आणि संघ या विरोधात गांधी वादाची मांडणी केली म्हणून अनेक ठिकाणी त्यांचे विरोधात केसेस करण्यात आल्या , 10जनपथ मधून त्यांना हाकलण्यात आले .
पण हा माणूस घडतं होता , ते परिपक्व होत होते , त्यांच्यातील
स्पार्टीयन योध्दा घडतं होता .
“थ्री हंड्रेड “नावाचा इंग्रजी सिनेमा ज्यांनी पाहिला आहे त्यांना लढवय्ये पण काय असते हे माहीत होते ,
सगळी व्यवस्था तुम्हाला क्रॅश करण्यासाठी उभी समोर ठाकलेली असताना , “
*मला मृत्यू आला तरी बेहत्तर पण मी गुडघे टेकून जगणे पसंत करणार नाही
शरणागती न स्विकारता ते लढत राहिले
मानसिक बल आणि शुध्द चारित्र्य नसणारे अनेक जण भयभीत होऊन सोडून गेले ,,
कन्याकुमारी ते काश्मीर “”भारत जोडो यात्रा जवळपास 3576किमी ते चालत राहिले
लोकांना भेटत राहिले , साध्या साध्या माणसात मिसळत राहिले , त्यांचेशी सुसंवाद करत राहिले ,,
कडाक्याच्या थंडीत ही फक्त टी शर्ट वर हा माणूस कसा फिरू शकतो?
याची उत्सुकता अनेकांना लागली .
पण त्याचे उत्तर साधे होते.
त्यांनी अश्या गरीब मुलांना पाहिले होते , ज्यांच्या जवळ स्वेटर
घेण्याची ऐपत नव्हती.
हे अर्धनग्न लोक थंडी सहन करू शकतात तर मी का करू शकणार नाही?
हे फकिरपण गांधी वादाने त्यांना दिले
या उलट स्वतः ला फकीर म्हणून घोषित करणाऱ्यांनी लाखो रुपयाचे कपडे परिधान केले , त्यांची सत्ता हा त्यांचा शौक बनला , जागतिक सफरीचे ते साधन बनले , फोटो जीवी म्हणून ते गाजले .
आम्ही एका मताने सत्ता गमावणारे अटल बिहारी वाजपेयी जी ही पाहिले आणि सत्ता संपादित करण्या साठी आमदार खासदार खरेदी करणारी बदललेली भाजपा ही पाहिली
या सगळ्या पार्श्वभूमीवर हे नेतृत्व पुढे येत आहे , त्यांचे वलय हे त्यांनी स्व कष्टाने , आपल्या निर्धारावर ठाम राहून लढून निर्माण केलेले आहे .
आज त्यांच्या कडे दलीत , आदिवासी , महिला , अल्पसंख्यांक आशाळभूतपणे पाहत आहेत .
आम्ही कोणत्याच सत्तेचे भागीदार नाही आहोत , आमच्या खिशात दहा रुपये ही नाहीत याची आम्हाला जाणीव आहे ,
पण आम्ही राहुल जी गांधी यांच्या प्रेमात पडलेले आहोत , हे Total love and affection ” आहे आणि ते unconditional ही आहे .
आमची इतकीच इच्छा आहे की , आत्ता शुध्दी करण झालेच आहे , या काँग्रेस चे प्रवाहात दलीत , भटके विमुक्त , अल्पसंख्यांक यांना भागीदारीत घ्या ,,, त्यांना प्रवाहाच्या बाहेर ठेऊ नका , त्यांना प्रशासनात , नौकरित , वाटा द्या , त्यांच्या रोजी रोटी चां प्रश्न सोडवण्यास मदत करा
आणि शांती पूर्ण जीवन जगता येईल इतके निर्भय वातावरण निर्माण करा
स्वातंत्र्या चां सूर्य झोपडी पर्यंत येऊ द्या इतकेच,,,,,,
या जन नायका कडे मागणे आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत