राम मंदिर झाले, 370 कलम रद्द झाले.. आता गड किल्ले आणि मराठी भाषा यासाठी कांहीतरी करा ; राज ठाकरेंची नरेंद्र मोदी कडे याचना.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढ्या सभा खुद्द प्रधानमंत्री मोदी घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्री यांना घेऊन पार पडलेल्या सभेत स्टार प्रचारक राज ठाकरेंनी ही भाषण ठोकले. शिवाजी पार्क च्या मैदानात ही भव्य सभा पार पडली.
नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच मंचावर एकत्र आले. राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता माझ्या 3 मागण्या पूर्ण करा असं म्हणत राज ठाकरे यांनी मागण्याची यादी वाचून दाखवली.
राम मंदिर बनवू असे फक्त सांगितले जात होते. राम मंदिर कधी बनेल असे वाटले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर प्रत्यक्षात उभे राहिले. 370 कलम रद्द झाले आता गड किल्ल्यांचे संवर्धन करा. मोदीजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. मोदींनी मागच्या पाच वर्षांत धाडसी निर्णय घेतले. मोदीजी मी तुमच्यापुढे पुढच्या पाच वर्षांसाठी उभा आहे असे राज ठाकरे म्हणाले.
शिवाजी पार्कवरच्या सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. अजित पवार मात्र थेट सभास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा पार पडली. तर दुसरीकडे अजित पवार मात्र स्टेजवरच बसून होते. त्यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण तसंच रामदास आठवले आणि उद्योग मंत्री उदय सामंतही स्टेजवर होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत