महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद

उल्हास नदीवरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राला महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीकडून होणारा वीज पुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण, डोंबिवली शहरांना होणारा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.पालिकेच्या मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर क्षमतेच्या उदंचन केंद्र आणि याच ठिकाणच्या जलशुध्दीकरण केंद्रास महावितरणच्या टाटा पाॅवर कांबा उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रातील फीडरच्या देखभाल, दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत केले जाणार असून यामुळे या उपकेंद्रातून मोहिली उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्रांना होणारा वीज पुरवठा बंद राहणार आहे. या दोन्ही केंद्रातून कल्याण, डोंबिवली शहरांना होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी १२ तासासाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे कल्याण परिसरातील टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण भाग, डोंबिवली पूर्व, पश्चिम भाग, कल्याण पश्चिमेतील चिकणघर, भोईरवाडी, रामबाग, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रस्ता, अशोकनगर वालधुनी, शिवाजी नगर, जोशीबाग, बिर्ला महाविद्यालय ते खडकपाडा परिसर, कल्याण रेल्वे स्थानक भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांनी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!