देशभारतमुख्य पानमुख्यपान

UN चा अहवाल ; भारतात 100 कोटींहून अधिक लोक सकस आहारापासून वंचित

युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की, 2021 मध्ये, भारतातील 100 कोटींहून अधिक लोक निरोगी आहार घेऊ शकले नाहीत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाच संस्थांनी जाहीर केलेल्या अन्न सुरक्षा आणि पोषण या विषयांवरील 2023 च्या अहवालात 74.1 टक्के भारतीयांना सकस आहार घेता येत नसल्याचं म्हटले आहे. या अहवालानंतर भारत सरकारच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, ज्यामध्ये केवळ 81 कोटी लोकांना अन्नाच्या मदतीची गरज असल्याचं सांगण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या अन्नसुरक्षा आणि पोषण संबंधी 2023 च्या अहवालात असं दिसून आले आहे की, भारतातील सुमारे 104 कोटी लोक निरोगी आहार घेऊ शकत नाहीत. आरोग्यदायी आहाराशी संबंधित अहवालात भारताचा क्रमांक फक्त पाकिस्तानपेक्षा कमी आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानातील 82 टक्के लोकांना सकस आहार मिळत नाही. म्हणजे, 24 कोटी लोकांपैकी सुमारे 19 कोटी लोकांना चांगला सकस आहार मिळत नाही.
यावर सरकारनं म्हटले की, भारतासारख्या देशाच्या छोट्या नमुन्यातून गोळा केलेला डेटा भारतातील कुपोषित (लोकसंख्येचं) प्रमाण मोजण्यासाठी वापरला गेला आहे, जो केवळ चुकीचा आणि अनैतिक आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!