महाराष्ट्रमुख्यपान

जरांगे पाटलांनी केले भाष्य् – “ज्यांनी आमचं आरक्षण खाल्लं”

ज्यांनी आमचं बोगस आरक्षण घेतलं आहे त्यांची संपत्तीही जप्त झाली पाहिजे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याचे ३० लाख पुरावे मिळाल्याची माहिती ही आम्हाला मीडियाकडूनच मिळाली आहे. २५ डिसेंबरला आम्ही काय करणार ते इतक्यात सांगणार नाही तो आमचा गनिमी कावा असणार आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सामान्य मराठे, शेतकरी, नोकरदार मराठे सगळे सभांना गर्दी करत आहेत. मराठ्यांनी आता ठरवलं आहे की शांततेत संघर्ष करुन मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा. मराठा समाजातल्या प्रत्येकाला हे वाटतं आहे की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. गनिमी कावा आहे तर आम्ही तो आत्ताच कसा काय सांगणार? असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!