देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

शिवजयंतीचा इतिहास


*अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड

आज सर्वत्र शिवजयंती उत्साहात, थाटामाटात साजरी करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत, परंतु १८७० पूर्वी काय स्थिती होती? ज्या शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केले, लोकांच्या मनात स्वातंत्र्याची जाणीव करून स्वराज्य निर्माण केले,हा जाज्वल्य इतिहास पेशवे यांनी नष्ट केला, सर्व प्रथम राष्ट्रपिता जोतीराव फुले हे रायगडावर गेले, महाराजांच्या समाधीचा तपास सुरू केला, समाधी काही सापडत नव्हती म्हणून सलग तीन दिवस तपास चालू ठेवला, शेवटी झाडाझुडुपांमध्ये फुलांच्या वेलीत असलेले समाधी शोधून काढली.
या समाधीवर पालापाचोळा, कचरा खूप प्रमाणात साचला होता,ते सर्व फुले यांनी साफ केले, समाधी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि समाधीवर मोठ्या श्रद्धेने फूलं वाहिली……
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून समाधीची पूजा केली असं ग्रामजोशीला समजले तेव्हा त्याला खूप राग आला,तो समाधीजवळ आला आणि लाथेने समाधी वरील फुले बाजूला केली आणि फुले यांना मोठ्या गुर्मीत म्हटला,अरे कुणबटा त्या शुद्र शिवाजीची समाधी स्वच्छ धुवून पुसून तू पूजा करतोस तो शिवाजी राजा होता काय?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी ही भाषा ऐकून त्यांना खूप दुःख झाले, यानंतर शिवाजी महाराज यांच्यावर चांगला पोवाडा लिहिला व १८७० मध्ये सर्वप्रथम पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात फुले यांनी पहिल्यांदाच शिवजयंती साजरी केली. पुढे बाळ टिळकांनी हे श्रेय आपल्याकडे यावेत म्हणून १८९५ रोजी शिवजयंती साजरी केली परंतु खरं श्रेय राष्ट्रपिता समाज सुधारक जोतिबा फुले यांना जाते.
यानंतर ३मे १९२७ रोजी मुंबई जवळ बेलापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, या शिवजयंतीचे अध्यक्ष होते युगप्रवर्तक विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर,या नंतर मात्र शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी होताना दिसून येत असली तरी मनात एक खंत राहते,ती खंत म्हणजे ज्या महापुरुषाने समाधी शोधून काढली, पोवाडा लिहिला, सर्व प्रथम शिवजयंती साजरी केली,दुस-या महापुरुषाने जयंतीचे अध्यक्षस्थान भूषविल्या नंतर आज सार्वजनिक जयंती उत्साहात साजरी होताना दिसून येते,मात्र बॅनर वर मात्र या महापुरुषांचे चित्र दिसून येत नाही एवढा हा समाज जो शिवरायांचा स्वताला अनुयायी समजून घेतोय तो समाज कृतघ्न झाला आहे काय? म्हणूनच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आपल्या बॅनर वर आरक्षण संविधानातमक देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढणारे राष्ट्रपिता जोतीराव फुले यांना टाळतात असं वाटतं?
असो परकीय गुलामगिरीतून मुक्त करून स्वाभिमानी सुराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा.
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक सिडको, नांदेड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!