महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती नको म्हणून लढणारे जितेंद्र आव्हाड-प्रकाश तक्षशील

जितेंद्र आव्हाड यांनी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणाऱ्या मनुस्मृती ला फाडले. काय हा स्टंटबाजी होता? जसे की काही विशिष्ट लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
अनावधानाने त्यांच्याकडून स्मृतीला फाडताना त्यावर बाबासाहेबांचा फोटो आहे, हे त्यांच्या लक्षात राहिले नाही. चूक कळल्यावर त्यांनी माफी पण मागितली.
परंतु काही विशिष्ठ लोकांना तेच दिसले , परंतु शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती नको म्हणून लढणारे जितेंद्र आव्हाड त्यांना दिसले नाही.
तेच लोक बाबासाहेबांचा अपमान केला म्हणून कांगावा करत आहे. मला त्याचं लोकांना विचारायचे आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी 14 एप्रिल ला राजगृह वर काळा झेंडा फडकावला होता, ते दिसले नाही ? बाबासाहेबांच्या जयंती दिनी राजगृह वरुन निषेध म्हणून काळा झेंडा फडकवून बाबासाहेबांचा अपमान केला, तेव्हा तेच लोक मुक दर्शक बनून तमाशा पाहत होते. आणि आज स्वतःला आंबेडकरी म्हणवून घेतात.

जितेंद्र आव्हाड च्या त्या कृत्याला स्टंट बाजी म्हणतात, तर मग Delhi मध्ये जे संविधान जाळल्या गेले होते, त्याचा एकमेव तीव्र निषेध म्हणून रस्त्यावर उतरणारे हे जितेंद्र आव्हाड हेच होते. तो पण स्टंट बाजी च होती काय?
शाही फेकने ही त्यांना स्टंट बाजी नाही तर याना हिरोगिरी वाटते ?

एक हिंदू जो बाबासाहेबांच्या विचारा प्रती प्रामाणिक असतो, सभा गृहा मध्ये ‘ सनातन ‘ याचा कट्टर विरोध करून हिंदू राष्ट्र कसे पूर्वीचे दिवस आणू पाहत आहे, असे निर्भिड पने बोलणारा जितेंद्र आव्हाड यांना का काट्या सारखा रुततो?
जे काम या लोकांना करायला पाहिजे होते, ते काम एक हिंदू करतो आहे, हेच त्यांना सलत असावे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कुण्या विशिष्ठ वर्गाची बपौती नाही आहे.
अनावधानाने म्हणा की अती उत्साहपणाने म्हणा त्यांच्या कडून हे कृत्य झाले आहे. व सर्व त्यांच्यावर तुटून पडत आहे. का बरं? ते हिंदू आहे म्हणून ? व तुम्हाला प्राप्त होणाऱ्या बौद्ध धर्मियांच्या लग्न पत्रिका, धम्म परिषदेच्या पत्रिका अश्या शेकडोने आयोजित केलेले धार्मिक कार्यक्रम, ज्या मध्ये बुद्ध तथा बाबासाहेबांचा फोटो हा असतोच, त्या सर्वांचे तुम्ही काय करता ? जाळता, फाडता की कुडेदान मध्ये फेकता ? जवळ सांभाळून तर ठेवतच नसाल. व हे सर्व तुम्ही जाणीव पूर्वक करता. तुम्हाला माहित असते सदर पत्रिकेवर बुद्ध तथा बाबासाहेबांचा फोटो आहे. तरी तुम्ही त्यांच्या सोबत असला दुर्व्यवहार करता. तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होत नाही ? नाही होत. कारण तुम्ही आंबेडकरी आहात म्हणून ? का बाबासाहेब वर आपला एकाधिकार आहे, ही भावना तुमच्या मध्ये असल्या मुळे ?

बाबासाहेबांनी आदर्श बौद्ध समाज कसा असावा, या बाबत खूप छान विवेचन केले आहे.ते तुम्ही एकदा वाचून बघा.
तुमच्या सद गुनाकडे पाहून इतर लोक तुमच्या कडे आकर्षित होतील असे कृत्य करा, असे बाबासाहेब म्हणाले होते. परंतु तुम्ही काय करत आहा ? आंबेडकरी विचारा प्रती प्रामाणिक असूनही ते तुमच्याकडे येतील की आपला रुख बदलतील ?
स्वार्थी व अंध भक्त बनू नका.

(हे लीहले म्हणजे मी हरिजनी, हरिभाऊ, काँग्रेस चे तळवे चाटनारे वगैरे विशेषण तर देणारच. द्या मनसोक्त पने द्या. हे प्रकरण जरा जास्तच वाढत चालले होते, म्हणून लिहावे लागले.)
(प्रकाश तक्षशील)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!