पत्रकाराची लेखनी ही सामाजिक न्यायाचं न्याय प्रविष्ठ शस्त्र आहे :- सुधिर पोतदार

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
ज्ञान व लोकशिक्षण यांचा पाया वृत्तपत्राच्या माध्यमातून घातला जातो आणि राष्ट्राच्या विकासात सुजाण नागरिकांचा सहभाग मिळवण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकारिता करू शकते .
पत्रकारितेच्या पेशाचे महत्व लोकशिक्षणाचे , लोक जागृतीचे , लोकसभेचे साधन म्हणून या माध्यमाला खूप महत्त्व आहे सामाजिक न्यायाचा खरा वारसदार म्हणून या वृत्तपत्राकडे पाहिले जाते .
समाजाच्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजाला न्याय देण्याचं प्रामाणिक काम पत्रकार करत आसतात .पत्रकारांची लेखणी खूप महत्त्वाची आहे कारण पत्रकारांच्या लेखणीतून बदल होतो आणि प्रत्येक मानवामध्ये बदलाने बदलाव होतो .
पत्रकारांची लेखणी ही शिलेदार आहे आणि न्यायप्रविष्ठ आहे असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुधीर पोतदार यांनी अध्यक्षीय समारोपा प्रसंग्गी केले
नुकताच नळदुर्ग शहरात दर्पण दिनाचे औचित्य साधून दिनांक १५ जानेवारी रोजी भाजूयूमोच्या वतीने नळदुर्ग शहरातल्या सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधिर पोतदार हे होत प्रथमता रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे सुनील बनसोडे यांनी केले
यावेळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे , नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , सचिव तानाजी जाधव , पत्रकार दादासाहेब बनसोडे , उत्तम बनजगोळे ,लतीफ शेख भगवंत सुरवसे , शिवाजी नाईक आयुब शेख , अजित चव्हाण अमर भाळे विशाल डुकरे सतीश राठोड आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे संजय विठ्ठल भाजपाचे जाधव, रजवी काझी गणेश मोरडे , सुनील चौधरी, रियाज शेख ,आयान इनामदार योगेश सुरवसे अमर बनसोडे मयूर महाबोले अक्षय भोई आदींच्या उपस्थितीत पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल बनसोडे यांनी केले शेवटी आभार सुनिल चौधरी यांनी मानले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत