महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

प्रसिद्धीसाठी महत्वाची बातमी . पत्रकारांनी आटपाडी तालुक्याच्या विकासाला मोठी चालना दिली . – सादिक खाटीक

आटपाडी दि . ७ ( प्रतिनिधी )

पत्रकारांनी समर्पित भावनेने दिलेल्या योगदानातून आटपाडी तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली तथापि पत्रकारांच्या सर्वस्पर्शी कामगिरीकडे काही अपवाद वगळता सर्वांचे दुर्लक्ष झाल्याची खंत ज्येष्ट पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी बोलून दाखविली .

६ जानेवारी च्या पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर फुले, शाहू , आंबेडकर विचार मंच आटपाडीच्या वतीने, पत्रकार मित्र तथा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या पुढाकाराने व त्यांच्या हस्ते पत्रकारांचा यथोचित सन्मान करणेत आला . त्यावेळी सादिक खाटीक बोलत होते .

आटपाडीसह दुष्काळी तालुक्यांमध्ये कृष्णेचे पाणी यावे, यासाठी डॉ . भारत पाटणकर, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडींच्या चळवळीच्या पायाचे दगड बनण्याचे आणि अनेक वर्षे सक्रीय सहभाग देण्याचे काम माझ्यासह अनेक पत्रकारांनी केले . आटपाडी तालुक्याचा आमदार व्हावा म्हणून राजेंद्रआण्णा देशमुख यांच्यासाठी जीवाचे रान करणारांमध्येही पत्रकारांचे मोलाचे योगदान होते . विविध विषयावर आंदोलन, उपोषण करण्यातही पत्रकार नेहमी अग्रेसर असत . भल्या भल्यांचा विरोध मोडून काढून शेटफळेचे गदिमा स्मारक अक्षरश : ओढत आणण्यात पत्रकारांची भूमिका मोलाची ठरली . अन्याय, अत्याचारा विरुद्ध असेल अथवा इतर शेकडो प्रश्नांत तालुक्यातले पत्रकार, स्वतःचीच समस्या, प्रश्न आहेत, अशा भावनेतून या प्रश्नांसाठी इमानदारीने लढले, हा गत ३६ वर्षाचा इतिहास आहे . आतापर्यत झालेल्या विधानसभा निवडणूकीत कवठेमहंकाळ – आटपाडी मतदार संघातून झालेल्या दोन वेळच्या निवडणूकीत दोन्ही तालुक्यांचा प्रतिनिधी एक – एक वेळ निवडून दिला गेला . तथापि खानापूर मतदार संघात आटपाडी तालुका असल्या पासूनच्या एकूण १३ निवडणुकांत फक्त एक वेळ बंडखोरीतून आटपाडीकर आमदार झाले . मात्र १२ वेळा खानापूर तालुका वाशीय आमदार झाले . या विसंगती, अन्यायाविरुद्ध कुणाचाही मुलाहिजा न ठेवता पत्रकारांनी सतत आवाज उठवावा . असे आवाहन करून सादिक खाटीक यांनी, एखादी दुसरी संस्था, एखादे दुसरे पद मिळवून धनवान होणाऱ्यांचे मुल्यमापन केल्यास फक्त अन् फक्त पत्रकारांनीच निस्पृह, प्रामाणीक भावनेने सेवा दिल्याचे दिसून येईल . भली पहाट ते रात्री उशीरापर्यत कोणतीही आधूनिक साधने नसतानाही पत्रकारीता गाजविण्याचे काम अनेकांनी गतकाळात केले . तथापि प्रामाणीकपणे जीवन समर्पित करणारांकडे नेहमीच अनेकांचे, शासन व्यवस्थेचे दुर्लक्ष झाल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले,

जगभरातल्या पत्रकारांच्या आदरस्थानी असणारे संपादक भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन नावाने सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असे सभागृह राजेंद्र खरात यांनी उभारण्यात पुढाकार घ्यावा . असेही आवाहन शेवटी सादिक खाटीक यांनी केले . आरशा सारखी स्वच्छ पारदर्शक पत्रकारीता करणारे आटपाडी तालुक्यातील पत्रकार मला नेहमीच भावले . या भावंडांशी मैत्रीपूर्ण नाते जपण्यात मी ३० वर्षे दिली आहेत . या सच्च्या समाज योद्धांचा सन्मान व्हावा त्यांचे कोडकौतूक करावे आणि समाजातील सर्व घटकांना या बांधवांचे समर्पित जीवन माहीत करून द्यावे या शुद्ध भावनेने या सर्वांना सन्मानीत करण्याचा हा प्रयत्न केल्याची भावना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी व्यक्त केली .

आटपाडी तालुक्यातील सर्व प्रश्न समस्या, माणसांसाठी तीळ तीळ तुटणारे लढणारे झगडणारे पत्रकार गेल्या ३० वर्षापासून मी जवळून पहात आलो आहे . माझे मार्गदर्शक सहकारी श्रीपुरचे बी टी शिवशरण यांच्याशी आटपाडीच्या पत्रकारीते संबधी चर्चेदरम्यान सादिक खाटीक यांच्या पत्रकारीतेची आवर्जून चर्चा व्हायची . अनंत आर्थिक अडचणींशी झुंजणाऱ्या प्रचंड अनुभवी पत्रकारांना शिक्षणाचा विचार न करता सरकारने समाजाने सन्मानीत करावे यासाठी आपण सर्व जण प्रयत्नांची पराकाष्ठा करुया अशी भावना प्रा . डॉ . उत्तम मोटे सर यांनी बोलून दाखविली .

आटपाडीच्या पत्रकारांनी पत्रकारीता व्रताचे नेहमीच पालन केले . रंकापासून रावांपर्यत सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला . अन्यायकर्त्यांवर आसूड ओढण्यात कशाचीही पर्वा केली नाही . पत्रकारांचा सर्वांनाच विसर पडलेल्यांच्या सध्याच्या जमान्यात राजेंद्र खरात यांच्या सारख्यांचे प्रेम पत्रकारांना नैतिक बळ देत असते अशा शब्दात दै. तरुण भारत चे आटपाडी तालुका प्रमुख सुरज मुल्ला यांनी आपल्या सत्काराला उत्तर दिले .

प्रारंभी स्वागत प्रास्तावीक सुत्रसंचालन शाम ऐवळे सर यांनी केले . तालुका पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष लक्ष्मणराव सरगर, प्रज्ञावंत कलाकार शिक्षक समाधान ऐवळे, ज्येष्ट पत्रकार अच्युत गिड्डे इत्यादींची यावेळी भाषणे झाली . यावेळी प्राचार्य रामदास नाईकनवरे, विचार मंच उपाध्यक्ष लक्ष्मण मोटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमाजीराव चव्हाण, दै. पुढारीचे तालुका प्रमुख प्रशांत भंडारे, जनप्रवासचे तालुका प्रतिनिधी सुशांत कासार, संपादक दीपक प्रक्षाळे, उपसंपादक धीरज प्रक्षाळे, दै. तरुण भारतचे मुजु तांबोळी, दै . लोकमतचे अमोल काटे विजय पवार , किरण सोहनी, विजय वाघमारे , रणजीत ऐवळे, जनार्दन मोटे, शरद वाघमारे, राजेंद्र मोटे, शशिकांत मोटे, महेश काटे इत्यादी अनेक जण उपस्थित होते . शेवटी आभार सुरेश मोटे यांनी मानले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!