जगभरात ज्या ज्या देशात दीर्घकाळ हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही आहे तिथली लोक लोकशाहीच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना सातत्याने दिसतात.

कुडमुडी लोकशाही असूनही एकाधिकारशाही राबवल्या जाणाऱ्या देशातही लोक लोकशाही मार्गांनी आंदोलन करताना दिसतात.
जिथ लोकशाही दीर्घकाळ पर्यंत नांदलेली आहे तिथल्या नव्या पिढीतल्या लोकांना ज्यांना लोकशाही आयती मिळालेली आहे त्यांना लोकशाही मूल्य, व्यक्तीस्वातंत्र्य , मानवी मूल्य यांची फारशी फिकीर नाही , उलट त्यांना एकाधिकारशाहीचे डोहाळे लागलेले आहेत.
जिथली जनता सजग आहे आणि जिथ नागरिकशास्त्र लोकांना समजत आणि आत्मसात केल जात तिथ आपल्या लोकशाही हक्कांसाठी लोक जागरूक राहतात आणि लोकशाही टिकवायला संघर्ष करतात.
ज्या देशात लोकशाही आहे, मानवी मूल्य, स्वातंत्र्य, समता, सहिष्णुता, बंधुभाव, सहकार्य याला महत्व आहे त्या देशातले नागरिक समाधानी आहेत.
द्वेषाच्या पायावर उभ्या राहिलेल्या देशातले नागरिक कधीही समाधानी होऊ शकत नाहीत.
एकाधिकारशाही , हुकुमशाही राजवटीला सतत जनतेला दाखवायला एक शत्रू लागतो.
या शत्रूची भीती दाखवून लोकांना सतत दबावाखाली आणि दहशतीखाली ठेवता येत.
पाकिस्तानच्या राजकारणाचा पाया भारताचा विरोध आणि भारताचे शत्रुत्व आहे.
या आंधळ्या द्वेषापायी पाकिस्तानची धूळधाण झाली, तीन वेळा घटना बदलावी लागली, निम्म्या पेक्षा जास्त काळ लष्करी राजवट आणि उरलेल्या काळासाठी लष्कराच्या टेकूवर उभारलेली लोकशाहीची बुजगावणी राहिली.
पाकिस्तानच्या सत्ताधीशांनी आणि लष्करी हुकुमशाहानी आपले खिसे भरले आणि परदेशात संपत्ती लुटून नेली.
आपल्याकड मुस्लीम द्वेषाचा बागुलबुवा उभारून एकाधिकारशाही आलेली आहे. लोकशाहीच बुजगावण जगाला दाखवायला उभ केलेलं आहे.
हा मुस्लीम द्वेषाचा मुखवटाहि खोटा आहे, मुस्लीम देशांशी व्यापार चालतो, मुस्लीम देशांची गुंतवणूक चालते , सत्तेच्या पाठीशी उभ्या असलेल्या उद्योगांना देशाची मालमत्ता दोन्ही हातानी देऊन टाकलेली चालते अस हे गणित आहे.
लोकशाहीची किंमत आणि महत्व ती गमावल्यानंतर कळत असेल तरी त्याचा उपयोग काय ?
आनंद शितोळे
आपल्याधडावरआपलेच_डोके
लोकशाहीची_बखर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत