महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

बोल महामानवाचे

” तुमच्या हिताचे कायदे आणणे व त्याकरिता झगडणे हे माझे कर्तव्य आहे व मी ते करीन असे मी तुम्हाला आश्वासन देतो.मी माझ्या कर्तव्यास जागेन पण त्याचवेळी तुम्हीपण तुमच्या कर्तव्यास जागले पाहिजे,हे मला तुम्हाला सांगावयाचे आहे.तुम्ही आपली चळवळ जोमदार केल्याशिवाय आपल्याला यश लाभणार नाही व आपले जीवित सुखाचे होणार नाही.

तिसरा प्रश्न आपण आपल्या उन्नतीचे कार्य करीत असता आपल्यावर जो जुलूम होतो त्याचे कसे निवारण करावयाचे? तुम्हाला माहीत आहे की,आपल्या विरूद्ध सारे जग आहे आणि त्याला तोंड द्यावयाचे म्हणजे ते दोन प्रकाराने द्यावयास हवे.प्रथमतः आपण प्रत्येकाने आपल्या मनातील भिती नाहीशी केली पाहिजे.ज्या ज्या वेळी आपल्यावर कोणताही जुलूम होईल त्यावेळेस जुलूम करणाराशी दोन हात करावयास न डगमगता तयार झाले पाहिजे.काय व्हायचे असेल ते होईल त्याला भिण्याचे कारण काय आहे? तुमच्याजवळ आहे काय की ते हरपण्याची धास्ती वाटावी? तुम्ही #मरणास देखील #भिता कामा नये.इतके तुम्ही #निर्भय झालात तरच तुमच्यावरील जुलमाचा तुम्हास प्रतिकार करता येईल.

आपल्यातील तरूण माणसानी आपल्या पेहरावात सुधारणा करायला हवी.धोतराच्या ऐवजी आखुड तुमान व अंगात एक कुडते म्हणजे स्काऊटचा ड्रेस केला पाहिजे.१८ वर्षापासून ४० वर्षापर्यंत प्रत्येकाने असा सुटसुटीत पोशाख केल्यास तुमच्या मनोवृत्तीत देखील बदल झाल्याशिवाय राहाणार नाही व तुमच्या मनातील भिती नाहीशी होईल.”

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ : ‘ जनता ‘ ८ व १५ जानेवारी १९३८
३१ डिसेंबर १९३७ रोजी पंढरपूर- सोलापूर जिल्हा अस्पृश्य राजकीय परिषदेत दिलेल्या अध्यक्षीय भाषणातील अंश….
समाज माध्यमातून साभार…. सध्दम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम.
सुधाकर ग्यानुजी पखाले
9075233272.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!