राज्य सरकारने पंचनाम्यांचा खेळ आतातरी थांबवावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दयावी – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

राज्य सरकारने पंचनाम्यांचा खेळ आता त्वरित थांबवावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दयावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले आहे. सरकारला आपली ताकद दाखवावी असा सल्ला ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
हिंगोली येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी ‘मातोश्री’वर ठाकरे यांची भेट घेतली. बँकेचे कर्ज फेडण्यास पैसे नसल्याने शरीराचे अवयव विकण्याची वेळ आली असल्याचे या शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांना अवयव विकण्याची वेळ आली आहे हे दुर्दैव आहे. या सरकारच्या काळातील कोणतीही योजना यशस्वी झालेली नाही. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे अशी टीका ठाकरे यांनी केली.
शेतकऱ्याचा एकीकडे अन्नदाता म्हणून गौरव करायचा आणि त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निर्सगाने हिरावून घेतलेला असताना मदतीचा हात आखडता घ्यायचा, हेच या सरकारचे काम आहे. सरकारने सर्व काही विकायला काढले आहे. अशा वेळी तुमचे अवयव विकण्याचा अविचार करू नका. या उलट राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत