
उद्योगपतींचे कर्ज माफ करणारे शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करणे आणि फसव्या योजना जाहीर करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या सरकारवर सुप्रीम कोर्टात दावा ठोकला पाहिजे आणि यांना जनतेनी मंत्रालयातून हाकलून दिले पाहिजे – प्रा. देविदास इंगळे
लोकशाही राज्य लोकांचे राज्य यांच्या बापाच्या मालमत्तेवर राज्य चालवत नाहीत.
लोकांच्या मतावर निवडून येणारे प्रतिनिधी लोकांचे ऐकत नसतील तर अशा लोकांना सत्तेत काय म्हणून ठेवायचे.
जनता म्हणेल त्याप्रमाणे कारभार चालवण्यासाठी यांना सत्ता दिली तर हे राजे झालेत जनतेला मूर्ख ठरवलंय वेड्यात काढलं या सरकारनी.
शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यायावजी यांनी उद्योगपतींचे कर्ज केलंय याचं कारण इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून अब्जावधी रुपये राजकारनासाठी इलेक्शन मध्ये मिळतील हा त्या मागचा हेतू आहे.
शेतकरी काय देतील पण शेतकऱ्यांना राममंदिर, 370 कलम, हिंदू राष्ट्र, हिंदू संविधान याचे गाजर दाखवले जाते आणि जनता भोळी भाबडी त्याच मुध्यावर मतदान करणार.
महत्वाची गोष्ट 15 लाख रुपये खात्यात, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा, वर्षाला दोन करोड नौकऱ्या, लाडक्या बहिणीला 2100 रुपये महिन्याला, महागाई कमी करणार अशी खोटी आश्वासनें देवून बीजेपी सरकार नें मतदान घेतलंय यातली एकही पूर्तता केली नाही म्हणून सरकारच्या विरोधात खोटा अजेंडा प्रशिद्ध करून लोकांची फसवणूक केली याबाबतीत सुप्रीम कोर्टात दावा दाखल करावा लागेल.
हे राज्य जनतेचे आहे परंतु हे सरकार जनतेला न जुमानता जनतेच्या विरोधात निर्णय घेतंय तर या सरकार विरोधात कठोर पावले उचलून सरकार ला मंत्रालयातून घरी हाकलून दिले पाहिजे.
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार महागाईनें त्रस्त आहेत पुन्हा केंद्र सरकार आठवा वेतन आयोग आणतेय वेतन आयोग लागला की महागाई वाढली त्याप्रमाणात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांचे उत्पन्न वाढेल काय? याचा गांभीर्याने विचार व्हायला नको का?
सरकार ठेवणे किंवा काढणे जनतेच्या हातात आहे.
म्हणून जनतेनी याबाबत रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे.
जनतेला अपेक्षित लोकशाही राज्य पाहिजे तेच झाले पाहिजे.
हिच अपेक्षा
धन्यवाद
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत