मूर्ती आणि विवेक…

डॉ. अनंत दा. राऊत
माणसाला मूर्ती आवडते
हे नाकारता येणार नाही.
पण कोणत्याही मूर्तीकडे
विवेकाने पाहता आले पाहिजे.
ज्याची किंवा जिची ती मूर्ती आहे,
ती विभूती कोणत्या मूल्यांसाठी जगली
त्या मूल्यांचे प्रतीक म्हणून
तिच्याकडे पाहता आले पाहिजे
आणि तिच्याकडे पाहून
ती मूल्ये अंगी बाणली पाहिजेत.
ईश्वर अल्ला गॉड मूर्तीत नसतो
हे इस्लामचे म्हणणे खरेच आहे.
हे फक्त इस्लामनेच म्हटले आहे असे नाही.
इतरही अनेक ग्रंथात हे म्हटलेले आहे.
स्वामी दयानंद सरस्वती
यांनी देखील मूर्ती पूजा नाकारलेली आहे.
पण तरीही मूर्ती फोडण्याची प्रवृत्ती
मला मान्य नाही. ही प्रवृत्ती अविवेकी व क्रूर आहे.
मूर्ती हा प्रदीर्घकाळ टिकणारा
मानवाचा सांस्कृतिक ठेवा असतो.
मूर्ती ही काही मानवी मूल्ये
आणि विशिष्ट ध्येयवादाची वाहक असते.
मूर्ती अर्थातच दगड अथवा धातूची असते.
दगड अथवा धातू प्रदीर्घकाळ टिकणारा असतो.
तरीही तो चैतन्यहीनच असतो.
चैतन्यहीन घटकात प्राणप्रतिष्ठा करणे
हा भाबडेपणाच.
मूर्तीची पूजा, अभिषेक इत्यादी कर्मकांडे करणे,
मूर्तीकडे काहीतरी मागणी करणे
हाही बाभडेपणाच
हा फाबडेपणा अंधश्रद्धेला फार मोठी प्रतिष्ठा देतो.
जिथे अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठित होते,
तिथे बुद्धिवाद आणि विज्ञानवादाचा
विकास होणे कठीण असते.
जिथे बुद्धिवाद आणि विज्ञानवादाचा अभाव असतो,
तिथे मूलभूत संशोधन व प्रगती कठीण असते.
कारण भाबडे लोक कुठलेही काहीही
नवे निर्माण करू शकत नसतात.
भाबडेपणावर असंख्य लोक विश्वास ठेवतात
म्हणून विवेकी जणांनी
तो ठेवलाच पाहिजे असे नाही
जगातले सारेच लोक भाबडे बनले
तर जग पुढे तरी कसे जाणार?
दि.२२ जाने.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत